फडणवीसांच्या धक्क्यानंतर मंत्री विखेंची सारवासारव? ‘त्या’ बदल्यांना स्थगिती नाही तर…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याच पक्षातील निकटवर्तीय भाजप मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री राधाकृष्ण विखे यांना जोरदार धक्का दिला आहे. जलसंपदा विभागात 60 हून अधिक असिस्टंट ते एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर्सच्या बढत्या आणि बदल्यांच्या कार्यवाहीला स्थगिती दिली आहे. दरम्यान यावर मंत्री राधाकृष्ण विखे यांनी भाष्य केले आहे.

मंत्री राधाकृष्ण विखे म्हणाले, यावर बोलताना मंत्री राधाकृष्ण विखे म्हणाले देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती वगैरे काही दिली नाही. त्या विभागातील काही लोकांच्या बदल्या या गैरसोयीच्या होत्या. काहींनी बदलांसंदर्भात विनंती देखील केल्या होत्या त्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विभागाला सूचना दिलेल्या आहेत. असे यावेळी बोलताना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे म्हणाले. तसेच यावेळी पुढे बोलताना विखे म्हणाले की, स्थगिती वगैरे काही नाही येणाऱ्या एक-दोन दिवसांमध्ये आवश्यक आदेश निघतील असं देखील मंत्री विखे म्हणाले.

सध्या या विभागात अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा कार्यवाही सुरू आहे. यातच जलसंपदा विभागातील 60हून अधिक असिस्टंट ते एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर्सच्या बढत्या आणि बदल्यांमध्ये आर्थिक गैरव्यवहारांच्या तक्रारी झाल्या. याची तक्रारींची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री फडणवीसयांनी या बढत्यांना आणि बदल्यांना तत्काळ स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय म्हणजे आपल्याच पक्षातील दोन बड्या नेत्यांना धक्का दिल्याचे चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

राज्यात सध्या पवार कुटुंब व ठाकरे कुटुंब हे एकत्र येणार अशा चर्चा रंगत आहे यावरती मंत्री राधाकृष्ण विखे यांनी भाष्य केले आहे ते म्हणाले की, दीड कोटी सदस्य असलेला भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे. कोणी एकत्र येणे आव्हान निर्माण करत असेल किंवा कोणी असं म्हणत असेल तर असं काही नसतं असं मंत्री राधाकृष्ण विखे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *