बेंगळुरूमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पूर्णा प्रज्ञा लेआउट येथील ओयो हॉटेलच्या रूममध्ये एका तरूणाने आपल्या 36 वर्षीय प्रेयसीची हत्या केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी सांगितले की, ही घटना शुक्रवारी घडली आहे. घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी घटनेची माहिती देताना सांगितले की, 25 वर्षीय यशने पूर्णा प्रज्ञा लेआउट येथील ओयो हॉटेलच्या खोलीत त्याची प्रेयसी 36 वर्षीय हरिनी हिची हत्या केल्याचा आरोप आहे. दोघेही केंगेरी येथील रहिवासी असल्याचे समजते.
नेमकं काय घडलं?
यश हा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. ही घटना शुक्रवारी रात्री घडली, परंतु दोन दिवसांनी रविवारी ती उघडकीस आली. या प्रकरणी सुब्रमण्यपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीसीपी दक्षिण लोकेश जगलासर म्हणाले की, बेंगळुरूमधील सुब्रमण्यपुरा पोलिस स्टेशनच्या हद्दीत 6-7 जून रोजी एका 36 वर्षीय महिलेची तिच्या जवळच्या मित्राने हत्या केल्याचा आरोप आहे.
आरोपी आणि मृत महिला एकमेकांना सुमारे एक वर्षापासून ओळखत होते, परंतु मृत महिला गेल्या दोन महिन्यांपासून हळूहळू आरोपीपासून दूर जात होती. त्याला इग्नोर करत होती, याचा राग येऊन आरोपीने महिलेवर चाकूने वार करून खून केल्याचा आरोप आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे आणि तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
बेंगळुरू पोलिसांनी सांगितले की, 25 वर्षीय यशने पूर्णा प्रज्ञा लेआउटमधील एका ओयो हॉटेलच्या रूममध्ये त्याची प्रेयसी हरिनी (36) हिची चाकूने वार करून हत्या केली. पोलिसांनी सांगितले की, आरोपी यश हा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मृत महिला आणि आरोपी एकमेकांना ओळखत होते, परंतु कालांतराने ती महिला हळूहळू आरोपींपासून दूर जात होती. याचा राग येऊन आरोपीने महिलेची हत्या केली.
इंदौरची नवविवाहितेने पतीची केली हत्या
राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी यांचे 11 मे रोजी इंदौरमध्ये लग्न झाले होते. ते 20 मे रोजी ते दोघे हनीमूनसाठी मेघालयला गेले होते. सुरवातीला त्यांनी गुवाहाटीमध्ये कामाख्या देवीचं दर्शन घेतलं आणि ते पुढे मेघालयला निघाले. सुरुवातीला दोघांशी संपर्क होत होता, मात्र नंतर संपर्क तुटला. राजाच्या मोठ्या भावाला वाटले की नेटवर्कचा काहीतरी अडथळा असेल, पण 24 मे पासून दोघांचे मोबाईल बंद झाले. त्यामुळे त्यांना चिंता वाटू लागली. सोनमचा भाऊ गोविंद आणि राजाचा भाऊ विपिन यांनी शिलॉन्ग गाठले आणि शोध पथकासोबत त्यांचा शोध घेऊ लागले.
मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांनी ‘एक्स’वर माहिती देताना सांगितले की, “राजा रघुवंशी हत्याकांडात सात दिवसांच्या आत मेघालय पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. मध्य प्रदेशमधील तीन हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे, महिलेनं सरेंडर केलं आहे आणि आणखी एका हल्लेखोराला पकडण्यासाठी ऑपरेशन अजूनही सुरू आहे.” तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनमने उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथे एका ढाब्यावर आत्मसमर्पण केले.
या प्रकरणात आणखी काही आरोपी असण्याची शक्यता असून पोलीस कसून तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. सोनमने पोलिसांना दिलेल्या जबाबात हत्येची कबुली दिली असून तिने हे कृत्य का केले, याचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेनंतर रघुवंशी कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी आरोपींना अटक करून पुढील कारवाई सुरू केली आहे.
Leave a Reply